Tuesday, July 23, 2019

तो पावसाळा

                                    तो  पावसाळा ...... !!

                                              

साधारणतः आपल्याकडे ३ मुख्य ऋतू आहेत .त्यापैकी एक पावसाळा ... पण हल्ली मुख्य तीन ऋतू राहिलेच नाही कारण कधीही गरम होत , कधीपण पाऊस पडतो, कधीही थंडी वाजते . पण त्यातल्या त्यात पावसाळ्याची मज्जा काही वेगळी असते. आपल्याकडे लोकांना पाऊस पडला तरी प्रॉब्लेम आणि नाही पडला तरी प्रॉब्लेम ... बिचारा  पाऊस तरी काय करेल . खूप वर्षांपूर्वी निसर्गाचं चक्र एकदम सुरळीत चालू होत . ४ महिने पाऊस , ४ महिने थन्डी , आणि ४ महिने उन्हाळा असं चित्र असायचं . पण हल्ली काही वर्षांपासून निसर्गाचं चक्रच बदललं आहे . जसे मी वरती म्हणालो कि कधीही पाऊस पडतो . 

हरिच्चंद्र गड 

माणसाने तंत्रज्ञान ,शिक्षण , आरोग्य सर्व क्षेत्रात प्रगती केली पण हे करत असताना त्याने निसर्गाकडे दुर्लक्ष केलं . त्याचाच परिणाम आज आपल्याला भोगावा लागत आहे . हा पावसाळा कधी आपल्याला सुखाचे क्षण देतो , तर कधी आपल्याला भयानक रूप दाखवतो . त्यामुळे पावसाळा हा कोणाच्या आवडीचा  तर कोणाच्या नावडीचा विषय असतो .                                

पावसाळा म्हटलं कि आठवतात ते काळे काळे ढग , विजांचा कडकडाट , मातीचा सुगंध  सगळीकडे प्रसन्न वातावरण  , pavsali khurakआणि त्यात गरमागरम भजी किंवा उकडलेली कणसे आणि चहा  हे असेल तर म काही बघायलाच नको .अगदी दुग्धशरकारयुक्त  योगच . तसेच  लोकांची पाऊले वळतात ती म्हणजे धबधबे , किल्ले , नद्या यांच्याकडे . वातावरणच इतके भारी असतें ना कि पाहतच  राहावेसे वाटते . काही  किल्य्यांवरून इतके विलोभनीय  दृश्य पाहावयास मिळते ना कि आपली नजरच हटत नाही. हरिश्चंद्र गड , राजमाची  , रतनगड ,हरिहर यांसारखे किल्ले पावसाळ्यात फिरण्याची मज्जा काही औरच  तसेच लोणावळा , खण्डाळा  , कर्जत ,भीवपुरी , नेरळ माथेरान ही स्थळे पर्यटकांना आवर्जून  साद  घालतात . सहयाद्रीच्या दऱ्याखोऱ्या , आंबोली घाट , कोकणातील अन्य घाट  यांचे दृश्य लोकांच्या मनात घर करून बसतात . पावसाळ्यातील हि दृश्य एकदा पाहिली ना कि डोळ्यात साठून राहतात कि ती दीर्घकाळ विसरता येत नाहीत . 

मुंबई लोकल 

आता बघूया पावसाळ्यातील दुसरी बाजू .. काही ठिकाणी पाऊस इतका पडतो कि म्हणाव लागत  "बाबा रे बस्स् आता ....खूप झालं ".   या पावसाने अनेक जणांची घरे उध्वस्त केली आहेत. अनेकांना बेघर केलं. अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले . अतिशय वाईट  परिस्थिती निर्माण केली या पावसाने . शेवटी निसर्गापुढे कोणीच काही करू शकत नाही तसेच काहीसे झाले . २६ जुलै चा पूर हा त्यापैकीच एक आहे. त्या आठवणी आठवल्या कि  अजूनही अंगावर शहारा येतो . अजून अशा अनेक घटना सांगता येतील . पण या घटनांना माणूसही तितकाच जबाबदार आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही. 

तर हे असं आहे . कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू असतातच ... एक चांगली नि एक वाईट  तश्याच लोकांच्या पावसाबद्दलच्या काही सुखद आठवणी आहेत तर काहींच्या दुःखद .. पण काही झालं तरी हा पाऊस आपल्याला बऱ्याच आनंदच्या गोष्टी देऊन जातो, आपले सगळे दुःखच  काळज्या थोड्या वेळासाठी दूर करतो . काही जणांच्या आयुष्यात पावासामुळे अनेक बदल घडून आले . काहींना पावसाने जगायला शिकवले ,अनेकांना अनुभव  दिले .   

                       असा हा ..  तो पावसाळा  ..... ..... !!!!!!   

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...